ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

आदर्श प्रेम मंगल परिणयाने जोडले दोन धर्मातील जिव्हाळ्याच्या संबंधाने रेशीमगाठी!

“रबने बना दी जोडी”…!!!

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड – (दि. 02 मार्च) तालुक्यातील विडूळ येथील मुलगी व दिल्ली येथील मुलगा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची मैत्री झाली.

मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनीही विवाह करण्याच्या निर्णय घेतल्या मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने त्यांना लग्न करण्यास अडचण भासत होती,

मात्र परिवारातील लोकांनी एकत्र येत त्यांचा आदर्श प्रेम मंगल परिणय येथील हॉटेल अनुरत्नामध्ये शुक्रवार 28 फेबुवारी रोजी थाटामाटात साजरा करून दोन धर्मामध्ये जिव्हाळ्याचे संबंध जुळल्या गेल्याने मंगल परिणय साजरा करण्यात आला.

दिल्ली येथील सिख धर्मातील जसदिप रणजीत सिंग (28) आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील बौद्ध धर्मातील पल्लवी देवराव मुनेश्वर (23) यांचे मागील दोन वर्षापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झाली त्याचे रुपांतर प्रेमात झाले लग्नाच्या मात्र लग्नाला जात,धर्म आडवा आला.

यावेळी मुलाकडील रणजीत सिंग, गौरमीत कौर, अमरीत सिंग, अमणजीत कौर, प्रितपाल सिंग, अमणदिप सिंग, प्रितपाल सिंग व मुलीकडील ननान मुनेश्वर, मिलींद धुळे, अनिल कांबळे, सुबोध मुनेश्वर, लक्ष्मण धुळे,गोवर्धन धुळे, अतुल धुळे या मंडळीने लग्नास होकार दिला आणि येथील हॉटेल मध्ये बौद्ध धर्म पद्धतीने लग्नसोहळा पार पडला.

जात आणि धर्माच्या भिंती तोडून हा आदर्श प्रेम मंगल परिणयसंपन्न झाल्यामुळे वधु वरांच्या चेहऱ्यावर आनंदओसंडून वाहत होता.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!