जिल्हा परिषद ब्राह्मणगाव गटामधून एक ज्वलंत महीला कणखर नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई कांबळे

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 01 नोव्हेंबर) एक ज्वलंत महीला कणखर नेतृत्व प्रणिताताई कांबळे इतरा प्रति काहीतरी करण्याची समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्रणिताताई ताई कांबळे हे ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटामधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छुक आहेत आतापर्यंत उमरखेड महागाव विधानसभेमध्ये त्यांचं काम पाहता व त्यांचा असलेला जनसंपर्क त्यांची कार्य करण्याची पद्धत ही अप्रतिम आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन ते सातत्याने कार्य करत असतात.

ते हरदडागाव येथील रहिवासी असून उच्चशिक्षित आहेत महिलांसाठी सुद्धा अनेक उपक्रम राबवून महिला कशा सक्षम हो येतील याच्यासाठी ते अनेक उपक्रमशिल असतात व छोट्या छोट्या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करतच असतात गेल्या अनेक वर्षापासून ते करतही आहेत.

महिलावर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सुद्धा ते अनेक तंटे मिटवण्याची कामे करत असतात उमरखेड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये परिसरातील गोरगरीब जनतेतील वृद्ध व महिला साठी आजाराने ग्रसलेल्या जनतेसाठी ते सातत्याने हॉस्पिटलची सुद्धा जमेल तशी मदत व त्यांना सहकार्य करत असतात त्यांचे हेच कार्य पाहून त्यांचा मनमिळाऊ स्वभाव पाहून त्यांच्या पाठीशी ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटामधील अनेक समाजामधील कार्यकर्ताचा व महिला पुरुष यांचा पाठिंबा आहे व त्यांना स्वतःहून म्हणत आहेत की आपल्यासारखे एक सक्षम नेतृत्व ब्राह्मणगाव भागाला मिळालेला आहे.

त्यामुळे प्रणिताताई कांबळे यांनी सदरील निवडणूक ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटातून लढावी कारण राजकारणामध्ये महिलांचे प्रमाण फार कमी आहे आणि असं सक्षम नेतृत्व जर राजकारणात आले तर ते समाज हिताची कामे होतील,समाजामधील दुर्बल घटकाला सोबत घेऊन एका पथानी मार्गक्रम करून सर्वांना सोबत घेऊन आरोग्य शिक्षण यासाठी कार्य करण्याचे ध्येय एक उच्चशिक्षित तरुण ज्वलंत नेतृत्व या भागाचा विकास करू शकते असं समाजा मधून बोललं जात आहे.
