छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर पुर्ण देशाचे आराध्य दैवत – दिलीप सारडा

– दिलीप सारडा यांचे मनोगत
✍️बबलू भालेराव (मुख्य संपादक)
उमरखेड (दिनांक 20 ऑक्टोंबर) छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर पुर्ण देशाचे आराध्य दैवत आहे त्यांना मी नमन करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो. मला हे जग दाखविणारे माझे वडिल स्व. पुरुषोत्तमजी सारडा यांना मी नमन करतो.
1) सन 1952 साली उमरखेड ला भारत स्वतंत्र झाल्यावर भारत सरकारला पेट्रोल डिझेल जनतेला पुरविण्यासाठी अतिदुर्गम भागात पण पेट्रोल पंप लावावयाचा आवश्यकता भासल्यामुळे बरमा सेल, इस्सो, कॅलटॅक्स ह्या जागतीक दर्जाच्या कंपन्यांना भारतात पेट्रोल पंप लावण्यासाठी आमंत्रित केले व ज्या ज्या गावात पंप लावावयाचे आहे.

त्याची यादी त्यांना वितरीत केली. त्यावेळी उमरखेड हे अतिदुर्गम गाव होते. उमरखेड नंतर यवतमाळ, पुसद, नांदेड, वाशिम, आदिलाबाद ह्या गावामध्येच पेट्रोल पंप होते. साधारणतः 100 कि.मी. च्या परिसरात बरमा सेल ने उमरखेड व परिसराच्या जनतेसाठी पेट्रोल पंप सुरु केले व सदर पेट्रोल पंप वितरकाव्दारे चालविले. बरमा सेलला भारत सरकारच्या आदेशावरुन त्यावेळेस उमरखेड हे गांव मध्यप्रदेशात होते.

मध्यप्रदेश राज्यशासनाला सदर कंपनीला जागा लिजवर उपलब्ध करुन देऊन पंप उभा केला व पेट्रोल, डिझेल जनतेला वितरीत करणे सुरु केले. सन 1960 साली जेंव्हा महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तद्नंतर सदर जागेची मालकी ही महाराष्ट्र शासनच्या मालकीची झाली. जेंव्हा पंप बरमा सेल कंपनीने उभा केला त्यावेळी सदर पंप हा गावाच्या बाहेर होता.

गावाची जनसंख्या कमी होती. जस जशी जनसंख्या वाढत गेली, वाहनांची संख्या वाढत गेली तशी उमरखेडला दुसऱ्या पंपाची आवश्यकता भासली तेंव्हा सन 1976 मध्ये हनुमान ऑटोमोबाईल हा पंप इंडियन ऑईलने उभा केला. सन 2005 साली गावातील जनतेला सुलभतेने पेट्रोल डिझेल उपलब्ध व्हावे म्हणुन हिंदुस्तान पेट्रोलियमने माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांना वितरक नेमुन पंप उभा केला. आज सध्यास्थितीमध्ये उमरखेडला भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम हे दोन पंप गावात असुनही ग्राहकांना सुलभतेने पेट्रोल मिळत नाही. अजुन दोन ते तिन पंपाची गावात आवश्यकता आहे .असे वाहनांच्या वाढत्या संख्येच्या आकडेवारीनुसार परिस्थिती दिसत आहे.

2) सन 1952, 1976, 2005 तद्नंतर बरेच पेट्रोल पंप उमरखेड शहराबाहेर लावल्या गेले आहेत. पण गावावासीयांच्या सुविधेसाठी हे पंप पेट्रोल व डिझेल घेण्यास अवघड आहेत. ढाणकी बिटरगांव रोडवर बरेच शाळा व कॉलेजेस आहेत. त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीना गावातच पेट्रोल भरुन शाळा कॉलेजमध्ये जावे लागते. ते भारत पेट्रोलियमचे पंपावरुन घेणे त्यांना सोपे जाते.3) सन 1976 साली स्व. इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या.

तेंव्हा बरमा सेल, इस्सो, कॅलटॅक्स या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करुन चालु पंप, पेट्रोल डिझेल च्या रिफायनऱ्या भारत सरकारने ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत खरेदी केल्या व त्याकरीता एक कायदा पारीत केला. त्यानुसार बरमा सेलच्या लिजवर असलेल्या जमीनी स्वतःहुन बरमा सेलचे नविन नाव भारत पेट्रोलियम यांना शासनाने वर्ग करुन टाकल्या व भारत पेट्रोलियमला वेळोवेळी महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांच्या आवश्यकतेनुसार लिजवर असलेल्या जमिनीची लिज वाढवुन दिल्या गेले व आमचे कंपनीचे पंपाला असेच वेळोवेळी लिज जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी वाढवुन दिलेल्या आहेत.

.4) लिजचे भाडे फार मोठ्या प्रमाणात महसुल जिल्हाधिकारी साहेब व महाराष्ट्र शासन यांना आमच्या कंपनीकडून छोट्याश्या खाली प्लॉटचे मागील पाच वर्षात जवळपास 19,00,000/- रुपये (अक्षरी एकोणवीस लाख रुपये) सन 2020 साली भारत पेट्रोलियमने सरकारी खजिन्यात जमा केले आहेत. ह्या प्रमाणे शासनाला भरघोस महसुल प्राप्त झाला आहे.5) सन 2010 साली स्थानिक नगर प्रशासनाने लिजला वाढविण्यासाठी आक्षेप घेतले होते. सदर आक्षेपातुन जिल्हाधिकारी साहेब यांनी लिज कॅन्सल केली होती. त्यांच्या विरुध्द भारत पेट्रोलियम यांनी मा. हायकोर्टात याचिका दाखल करुन त्या याचिकेवरील निकालात जिल्हाधिकारी साहेब यांना लिज कॅन्सल करावयाचा कुठलाही अधिकार नाही असे आदेश जिल्हाधिकारी साहेबांना दिले.

त्यावरुनपुढील कार्यकाळाकरीता जेंव्हा भारत पेट्रोलियमला लिज वाढवुन पाहिजे तेंव्हा मिळत गेली. हायकोर्टाने दिलेला हा निकाल कायदा झाला आहे.6) दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक भारत पेट्रोलियमचे पंपामागे नगर परिषदेने उभारण्याचे काम सुरु आहे. सदर कार्याला आम्ही कुठेही अडचण निर्माण केलेली नाही. भारत पेट्रोलियमने देखील कुठलीही हरकत घेतली नाही.7) सदर पंपाच्या जागेवर सन 1952 पासुन आहे त्या स्थितीत जश्याचा तसा आजही उभा आहे आणि उमरखेडला अव्याहतपणे पेट्रोल डिझेल सप्लाय करीत आहे.सन 1952 पासुन पंप कार्यरत आहे पण ग्राम दैवत हनुमान मंदिर ह्यापुर्वीच्या काळापासुन स्थित आहे व सन 1952 पासुन लाखो नवरदेव हनुमान मंदिराचे चरण स्पर्श घेण्याकरीता येतात व त्यांच्या आर्शिवादाने संसारात बिनदिक्कत रममान होतात व त्यांचा परिवार वाढवितात. सदर कार्यात पंपापासुन कोणालाही काही ईजा झाल्याची आजपर्यंत शासन दरबारी नोंद नाही. 8)9) मागील 75 वर्षात भारत पेट्रोलियमच्या पंपावर कोणत्याही ज्वालाग्राही घटना किंवा स्फोट पेट्रोल डिझेल वितरण करतांना घडलेली नाही व तशी नोंद देखील पोलीस स्टेशन कार्यालयात झालेली नाही.

10) महाराजाच्या स्मारकाची उंची ही पेट्रोल पंपापेक्षा जास्त असल्यामुळे पश्चिमेकडून महाराजाची लहरती तलवार दक्षिणेकडून देखील स्पष्टता स्मारकाचे दर्शन होत आहे. त्यात कुठलीही अडचण दिसत नाही.
11) नगर पालिका संभागृह हे स्मारकाचे पार्श्वभागाचे मागे असुन बऱ्याच अंशी नगर पालिका प्रांगणात स्थित आहे. सदर सभागृह वापरण्यास कुठलाही अडथळा पेट्रोल पंपामुळे येत नाही.
12,) आजही उमरखेड शहरवासीयांना भारत पेट्रोलियम कडून प्रती लिटर 15 पैसे पेट्रोल व डिझेल इतर IOC, HPC पेक्षा कमी दरात वितरीत करीत आहे. त्यामुळे दरवर्षी जनतेचा लाखो रुपयांचा फायदा आमची कंपनी करुन देत आहे.
13) बऱ्याच शाळा व कॉलेजेस ढाणकी रोडवर आहे. त्याकडे जाणाऱ्या जवळपास 400 ते 500 मुली यांना सुलभरित्या पेट्रोल भारत पेट्रोलियमचा पंप पुरवित आहे. भाजी बाजारात व किराणा खरेदी करण्यासाठी आलेल्या आया बहिणी यांनाही भारत पेट्रोलियम करुन पेट्रोल सुलभरित्या पुरविले जात आहे.14) सारडा पेट्रोल पंप हे बँन्ड नेम घेऊन आम्ही 1967 सालापासुन स्व. जेठमलजी माहेश्वरी काकाजी यांनी आम्हाला हा पंप चालविण्यासाठी दिला व तो पंप आजपर्यंत सुलभरित्या परिसराची सेवा देण्याचे कार्य आमच्याकडून होत आहे.15) आर.टी.ओ. यवतमाळ यांचे कार्यालयात उमरखेड विभागात प्रती मासिक 100 ते 120 दुचाकी, 10-15 कार, 10 ट्रॅक्टर, 20-25 अॅटो, 5-6 ट्रक शहरवासी खरेदी करीत असल्याची नोंद मिळते आहे. त्यांना विनाविलंब पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी शहरात अजुन दोन तिन पंपाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर विचार करुन त्या दिशेने सुध्दा पाऊल उचलले पाहिजे असे आम्हाला वाटते.16) विना विलंब जनतेला पेट्रोल डिझेल प्राप्त व्हावे अशी अपेक्षा असते. सदर अपेक्षा दि.11/06/2025 रोजी भंग झाल्यामुळे एका ग्राहकाने गावातील पाटील यांच्या पंपावरील सेल्समनवर चाकु हल्ला करुन त्यास ईजा पोहचविली. सदरची नोंद पोलीस स्टेशनमध्ये आहे. गुन्ह्याचा तपास चालु आहे.17) आदरनिय छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महाराष्ट्रच नाही तर देशाचे आराध्य दैवत आहे. आम्हाला पण ते दैवत आहे. यात काही शंका नाही.18) छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला दिलीप सारडा किंवा परिवारातील कोणत्याही व्यक्तीचा विरोध नसल्यामुळे उपोषणला बसलेल्या बंधुंना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत दिलीप सारडा किंवा परिवारातील कोणत्याही व्यक्तीला दोषी धरु नये.19) मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ हे जे निर्णय घेतील तो निर्णय भारत पेट्रोलियम व आम्हाला मान्य राहील.
